वाड्यात हरभऱ्याचे उत्पादन घटले

वाड्यात हरभऱ्याचे उत्पादन घटले

वाडा, ता. ९ (बातमीदार) : भातशेती परवडत नसल्याने वाडा तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात रब्बी शेती करून हरभरा पिकाकडे वळले होते. ऐन थंडीच्या वेळेला तयार होणाऱ्या या हरभऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र वातावरणात बदलामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे; तर दुसरीकडे बाजारात मिळणारा भाव परवडत नसल्याने हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
थंडीच्या दिवसांत तयार होणाऱ्या हरभऱ्याला मुंबई, ठाणे यांसह आसपासच्या शहरात मोठी मागणी असते. शहरांच्या ठिकाणी, तसेच चौपट्यांवर खवय्यांकडून हरबऱ्याला चांगली मागणी मिळत असते. त्यानंतर राहिलेला हरभरा कडधान्य म्हणून विकला जातो. वाड्याचा ‘काबोली’ हा हरभऱ्याचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. गातेस हे गाव हरभऱ्यासाठी प्रसिद्ध होते. पूर्वी १३० ते १५० हेक्टर जागेत हरभरा शेती केली जायची, मात्र वातावरणात बदल व भाव मिळत नसल्याने या शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येते. या वर्षी फक्त २५ ते ३० हेक्टर जागेत हरभरा शेती केली असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पिकाबरोबरच येथील शेतकरी फुलशेती, कांदा, मका, चारा शेती, कलिंगड, धने, मूग, वाल, उडीद व चवळी शेती करीत असून त्या पिकांनाही चांगला दर मिळत असल्याने हरभरा शेतीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येते.
....
गेल्या काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे हरभऱ्याला आलेली फुले गळून गेल्याने या वर्षी हरभऱ्याचे उत्पादन कमी आले आहे. तसेच वातावरण बदल व भाव मिळत नसल्याने हरभरा शेती करणे हळूहळू कमी केली आहे.
- कुमार पष्टे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com