विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत गांधी विद्यालय प्रथम

विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत गांधी विद्यालय प्रथम

अंबरनाथ, ता. २१ (बातमीदार) : मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत अंबरनाथच्या दि एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत मुंबई उपनगर परिसरातील सुमारे १७३ शाळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत लेखी परीक्षा होऊन त्यातील ३२ शाळांची पुढील प्रश्नमंजुषा फेरीसाठी निवड करण्यात आली. त्यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या तीन फेऱ्या झाल्या होत्या. यातून सांताक्रूझ येथील राजा रामदेव पोद्दार स्कूल, अंबरनाथचे महात्मा गांधी विद्यालय, दादरचे बालमोहन विद्यामंदिर आणि गोरेगावच्या सन्मित्र मंडळ विद्यामंदिर या शाळांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
२० फेब्रुवारी रोजी संघांची अंतिम फेरी झाली. यात महात्मा गांधी विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. आठ हजार रुपये रोख आणि चषक प्राप्त केला. शाळेतील दहावीतील ओमशक्ती बढे, भूषण ढोले आणि इयत्ता नववीतील हर्षल मदने व वेदांत बदडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com