शेकडो विद्यार्थी करतात ध्यान साधना
कल्याण, ता. २५ (बातमीदार) ः शासन आणि विपश्यना विश्व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मित्र उपक्रमांतर्गत ध्यानसाधनेचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर आणि शाळा सुटताना दहा मिनिटे विद्यार्थ्यांकडून ध्यान सराव करून घेतला जातो.
विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अभ्यासात मन न लागणे, अभ्यास करूनही ऐन परीक्षेत विसर पडणे अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी, राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार कल्याण डोंबिवली महापालिका शिक्षण विभागाअंतर्गत १९ सप्टेंबर २०२२ पासून विद्यार्थ्यांसाठी ‘मित्र उपक्रम’अंतर्गत आनापान सति ध्यान साधना सुरू करण्यात आली आहे. केडीएमसी शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विभागाने आनापान समन्वयक म्हणून चंद्रमणी सरदार यांची नियुक्ती केली आहे. पालिकेच्या शाळेतील ५०० हून अधिक विद्यार्थी एकाच वेळी शाळा सुरू होताना आणि शाळा सुटताना १० मिनिटे आनापान सति ध्यानाचे सराव करत आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.