अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी

अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. १० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अवकाळी पावसाने झोडपलेल्या परिसराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यांत अवेळी झालेल्या पावसामुळे शेतीपिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन निर्णयदेखील काढण्यात आला.
४ ते ८ मार्च व १६ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून शेतीपिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास जेवढ्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे, तेवढ्या क्षेत्राकरिता विहित दराने निविष्ठा अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. मार्चमधील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार आज निधी जिल्ह्यांना वितरित करण्यात आला.
...
वितरित केलेला निधी
अमरावती विभाग - २४ कोटी ५७ लाख ९५ हजार
नाशिक विभाग - ६३ कोटी ९ लाख ७७ हजार
पुणे विभाग - ५ कोटी ३७ लाख ७० हजार
छत्रपती संभाजीनगर - ८४ कोटी ७५ लाख १९ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com