खारघरप्रकरणी मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी

खारघरप्रकरणी मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी

खारघर, ता. २२ (बातमीदार) : महाराष्ट्र पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी उष्माघाताने मृत्यू झाल्याप्रकरणी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. आपच्या पदाधिकाऱ्यांनी या मागणीचे लेखी निवेदन खारघर पोलिसांकडे दिले आहे.

खारघर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने १३ श्री सेवकांचा मृत्यू झाला. या सोहळ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते, असे आपच्या वतीने सांगण्यात आले. आम आदमी पक्ष्याच्या महाराष्ट्र राज्य समिती सदस्य आणि स्थनिक कार्यकर्त्यांनी एमजीएम रुग्णालय, कंळबोली तसेच टाटा रुग्णालय, खारघर येथे जाऊन आजारी श्रीसदस्यांची भेट घेऊन चौकशी केली. निवेदन देताना आपचे महाराष्ट्र राज्य समितीचे राज्य सचिव धनंजय शिंदे, कोकण विभाग संयोजक डाॅ. अल्तमश फैजी, पनवेल अध्यक्ष अ‍ॅड. जयसिंग जगन्नाथ शेरे तसेच योगेश तिरूवा, मनोज घरत, भोलाकुमार सोनार आणि स्थानीक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com