राज्यभरातील नागरिकांचे जनता दरबारात गाऱ्हाणे

राज्यभरातील नागरिकांचे जनता दरबारात गाऱ्हाणे

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगरमधील जनता दरबारात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या समस्या लेखी मांडल्या. यावर डॉ. शिंदे यांनी जागीच तात्काळ यंत्रणा हलवली आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण झाल्याने ते सुखावून गेले.
गोलमैदान येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात डॉ. शिंदे हे सातत्याने जनता दरबाराचे आयोजन करून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देतात; मात्र शनिवारी (ता. २९) सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात कल्याण लोकसभा क्षेत्रातील नागरिकांसह जळगाव, बीड, रायगड, रत्नागरी, पालघर आदी जिल्ह्यांतून ३० नागरिक, शेतकरी यांनीदेखील त्यांच्या समस्या घेऊन खासदार कार्यालय गाठले. डॉ. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असल्याने आपल्या समस्या सोडवण्यात येणार हा विश्वास त्यांना होता. विशेष म्हणजे डॉ. शिंदे यांनी बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तात्काळ समस्या सोडवण्याचे आदेश दिले. तसेच काही समस्या या गहन असल्याने त्यांनी नागरिकांना अधिकाऱ्यांची वेळ मिळवून दिली. या वेळी पदाधिकारी अरविंद मोरे, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, राजेंद्रसिंह भुल्लर, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com