नवीन पाईपलाईन टाकूनही पाणी टंचाई

नवीन पाईपलाईन टाकूनही पाणी टंचाई

Published on

दिवा, ता. ३ (बातमीदार)ः नव्या पाईपलाईनचे उद्‍घाटन केल्यानंतरही दिवा शहरातील बहुसंख्य भागात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. अनेक नागरिकांना दोन ते तीन दिवसआड पाणीपुरवठा होत आहे. अशा परिस्थितीत उद्‍घाटन केलेल्या पाईपलाईनचा दिवावासीयांना काय फायदा झाला? या कामाचा हिशोब जनतेला सत्ताधारी देणार का, असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या दिवा महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांनी केला आहे.
दिवा शहरातील बहुतांश भागांत रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेक इमारतींना दोन ते तीन दिवस आड करून पाणीपुरवठा होत असून उपलब्ध होणारे पाणी पुरेशा प्रमाणात नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी घेण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या पाईपलाईनचे लोकार्पण झाल्यानंतर अद्याप दिवावासीयांना पाणीटंचाई भेडसावत असल्याने रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. पाण्याच्या नावाने दिव्यात होणारे राजकारण अतिशय घाणेरड्या स्वरूपाचे असून पाण्यासाठी लोकांना वेठीस धरण्याचे काम पालिका प्रशासन आणि माजी नगरसेवक करत असल्याचा आरोप ज्योती पाटील यांनी केला आहे. लोकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने २२१ कोटी खर्च करून नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनचा काय फायदा झाला, याचा हिशेब पालिका व माजी नगरसेवकांनी द्यावा, असे आवाहन ज्योती पाटील यांनी केले आहे. नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईन नेमक्या कुठे टाकण्यात आल्या, त्याचे व्हॉल्व कुठे लावण्यात आले आहेत. अंतर्गत जोडण्या कशा करण्यात आल्या आहेत, एकूण किती खर्च पाणी वितरण व्यवस्थेवर करण्यात आला आहे, याची संपूर्ण माहिती आता जनतेला मिळाली पाहिजे, असे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.