शिक्षकांच्या एका जागेसाठी आता तीन उमेदवार

शिक्षकांच्या एका जागेसाठी आता तीन उमेदवार

Published on

आता शिक्षकाच्या एका जागेसाठी तीन उमेदवार

शालेय शिक्षण विभागाचे शिक्षक भरतीसाठी सुधारित निकष

मुंबई, ता. ६ : राज्यातील शाळांमध्ये लवकरच होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी शालेय शिक्षण विभागाने सुधारित निकष जारी केले आहेत. त्यानुसार एका पदाच्या जागेच्या मुलाखतीसाठी केवळ तीन उमेदवारांना बोलावले जाणार आहे. यापूर्वी दहा उमेदवार बोलावले जात होते.
राज्यातील शाळांत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची भरती केली जाणार आहे. खासगी शाळांत टीईटी आणि अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत उच्च गुण असलेल्या उमेदवारांपैकी एकाची मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी संबंधित शिक्षण संस्थेचा विकल्प निवडलेल्या उमेदवारांचा प्राधान्यक्रम, गुणानुक्रम, पदासाठीचे माध्यम, प्रवर्ग, विषय आदी शाळा व्यवस्थापनाच्या लॉगीनमध्ये  उपलब्ध केले जाणार आहेत. शिक्षण संस्थांना मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे ३० गुणांच्या आधारे गुण द्यायचे आहेत. त्याचा निकाल पवित्र पोर्टलवर जाहीर करावा लागणार आहे. पोर्टलवरील शिफारस केलेले आरक्षण विचारात घेऊन उच्च गुण असलेल्या उमेदवाराची शिक्षकपदी निवड केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.