वाहतूक कोंडीमुळे अडथळ्यांची शर्यत

वाहतूक कोंडीमुळे अडथळ्यांची शर्यत

Published on

उरण, ता. ११ : शहरात वाहनतळ नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी पुतळ्याजवळ चारचाकी वाहने भर रस्त्यातच उभी केली जात आहेत. त्यामुळे उरण शहरातील वर्दळीच्या रस्त्यावरच दररोज वाहतूक कोंडी होत असून नगरपरिषद, तसेच वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे उरणकरांची अडथळ्यांची शर्यत सुरू आहे.
उरण शहरात दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी वाहनतळ नसल्याने वाहनचालक कुठेही वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे उरण शहरातील कोटनाका, जरीमरी मंदिर, खिडकोळी नाका, पालवी रुग्णालय, गणपती चौक तसेच स्वामी विवेकानंद चौक वाहतूक कोंडीची ठिकाणे झाली आहेत. या परिसरात चारचाकी वाहने रस्त्यालगत उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषदेकडून या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, तरी देखील मोठ्या प्रमाणात वाहने उभी केली जात असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे.
-------------------------------------------------
प्रशासकीय यंत्रणा बघ्याच्या भूमिकेत
उरण शहरातील प्रमुख रस्त्यांवर पूर्वी एक दोन वाहने उभी केली जात होती. परंतु, सध्या वाहनांच्या संख्येतच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे शहरात वाहनतळाची गरज असताना नगरपरिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे. तर वाहतूक विभाग देखील बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत नसल्याने बघ्याच्या भूमिकेत असलेल्या यंत्रणांमुळे त्याचा त्रास सर्वसामान्यांना होत आहे.
----------------------------------------
उरण शहरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. त्यामुळे उरण नगरपरिषदेने शहरात अधिकृत पार्किंग यार्ड बनवावेत. जेणेकरून ही समस्या सुटेल.
- संदीप पाटील, रहिवासी, उरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.