पाणीटंचाईचे संकट गडद

पाणीटंचाईचे संकट गडद

Published on

हेटवणे धरणात शंभर दिवसांचा साठा
खारघर, ता. ११ (बातमीदार) : सिडकोच्या क्षेत्रातील खारघर, उलवे, तळोजा, द्रोणागिरी या परिसरांना पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणात शंभर दिवस पुरेल, एवढा पाणी साठा आहे. अशातच राज्यात जून, जुलै महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
जून महिन्यात दरवर्षी हमखास पाऊस पडतो. त्यामुळे धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे अपुरा पाऊस तसेच धरण क्षेत्रात पाणीसाठा उपलब्ध नसल्याच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या अखत्यारीतील नोड आणि गावांमध्ये पंधरा टक्के पाणीकपात जाहीर केलेली आहे. दरवर्षी जुलै महिन्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पाणी कपात रद्द केली जाते. मात्र, यंदा अजूनही धरण क्षेत्रात अपेक्षित पाणी पाऊस झालेला नाही. त्यामुळे हेटवणे धरणात शंभर दिवस पुरेल, एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने सिडकोकडून पाणीकपात केली जात आहे.
---------------------------------------
टँकरने पाणीपुरवठा सुरू
सिडकोकडून होणारा अपुरा पाणीपुरवठा तसेच कपातीमुळे खारघर, तळोजा वसाहतीत अनेक सोसायटीत टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अशातच अजूनही धरण क्षेत्रात अपेक्षित पाऊस झालेला नसल्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन सिडकोने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.