मुरबाडमध्ये भातरोपांची वाढ खुंटली

मुरबाडमध्ये भातरोपांची वाढ खुंटली

Published on

मुरबाड, ता. ११ (बातमीदार) : यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने त्याचा परिणाम भातशेतीवर झाला आहे. मुरबाड तालुक्यात या वर्षी भाताच्या रोपांची वाढच खुंटली आहे. त्यातच आता दुबार भातपेरणी करणे शक्य नाही. त्यामुळे ३० ते ४० टक्के भातशेती ओसाड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जून महिन्यात पाऊस दाखल झाला. त्यानंतर मात्र पावसाची संततधार सुरूच राहिली. यामुळे रोपांची उगवण क्षमता कमी झाली. काही शेतकऱ्यांनी पाऊस उशिरा आल्याने दुबार पेरणी केली होती; परंतु तीदेखील वाया गेल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनसुद्धा रोपे कमी उगवली आहेत.

मुरबाड तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते. पूर्वी माळरानावर किंवा शेतात राबणी करून तेथे भाताची पेरणी केली जात होती; परंतु आता मजूर मिळत नाहीत. घरातील माणसे शेतीचे काम करण्यास तयार नसतात. त्यामुळे बहुतांश शेतकरी शेतामध्ये लुड करून भाताची रोपे लावतात. त्यामुळे भातरोपांची उगवण क्षमता कमी होते. तसेच रोपे वाहून जाण्याचे प्रमाणही वाढते. त्यातच यंदा उशिरा आलेल्या पावसाने उघडीप न घेतल्याने भाताची रोपे कमी उगवली आहेत.

यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी दुबार भातपेरणी करूनही रोपे कमी उगवली नाहीत. आता पुन्हा पेरणी केली, तरी भातरोपे उगवणार नसल्याने ४० ते ५० टक्के भातशेती विनालागवडीची राहणार आहे. त्या शेतांमध्ये इतर कुठल्याही पिकाची लागवड करणे शक्य नाही, त्यामुळे ही भातशेती ओसाड राहून शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.
- शंकर कोर, माजी सरपंच, आसोले

फोटो ओळी : मुरबाड ः शेतामध्ये भातपेरणीसाठी जमीन नांगरून ठेवणारा शेतकरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.