रानसईमुळे उरणवासी चिंतामुक्त

रानसईमुळे उरणवासी चिंतामुक्त

Published on

उरण, ता. १८ ः तालुक्यात काही दिवसांपासून पावसाने जोर पकडला आहे. तसेच घाटमाथ्यावरून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले आहे. अशातच मंगळवारी (ता.१८) रानसई धरण भरून वाहू लागल्याने उरणकरांची भीषण पाणीटंचाईतून सुटका झाली आहे.
उरण तालुक्यातील २१ गावे, उरण शहर आणि ओएनजीसी, एनएडीसह इतर औद्योगिक विभागासह सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिना जवळपास कोरडाच गेला होता. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. धरणातील मृत असलेला पाण्याचा साठा ही वापरण्यास सुरवात झाली असल्याने यंदा भीषण पाणीटंचाईचे मोठे संकट उरणकरांवर होते. मात्र, जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच धरणक्षेत्रात पावसाने जोर पकडला असल्याने पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत होती. अखेर रानसई धरण भरून वाहू लागल्याने उरणकरांसाठी ही आनंदवार्ता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.