चिखलोली धरण ‘ओव्हर फ्लो’

चिखलोली धरण ‘ओव्हर फ्लो’

Published on

अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : यंदा पावसाळा उशिराने सुरू झाला असला, तरी अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणारे चिखलोली धरण भरून वाहू लागले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने चिंतेच वातावरण निर्माण झाले होते; मात्र मागील आठवड्यात आणि गेल्या दोन - चार दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली. मंगळवार (ता. १८) चिखलोली धरण ओव्हर फ्लो झाल्याचे पहावयास मिळाले. मागील वर्षी १३ जुलै २०२२ रोजी धरण ओव्हरफ्लो झाले होते. अंबरनाथच्या शिवाजीनगर, वडवली, महालक्ष्मीनगर आदी परिसराला चिखलोली धरणातून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील इतर भागात बदलापूरच्या बॅरेज धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.