पालघर जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता

पालघर जिल्ह्यात २२ जुलैपर्यंत अतिवृष्टीची शक्यता

Published on

पालघर, ता. १८ (बातमीदार) : जिल्ह्यामध्ये २२ जुलैपर्यंत काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता ऑरेंज आणि रेड अलर्टच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. या कालावधीत समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये. तसेच अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता राहील. समुद्रास असणारी भरती, अतिवृष्टी व धरणांतून सोडण्यात येणारा विसर्ग यामुळे पूरप्रवण, सखल भागांतील घरांमध्ये पाणी शिरून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच कमी वेळेत अतिवृष्टी होत असल्याने दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे दरड व पूरप्रवण भागांतील नागरिकांनी अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन सतर्क राहावे. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे, त्याचप्रमाणे जनावरेदेखील सुरक्षित ठिकाणी बांधावीत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. आपत्कालीनप्रसंगी जवळच्या तहसील कार्यालय तसेच पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या ८२३७९७८८७३ अथवा टोल फ्री क्रमांक १०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.