कळंबोलीत दोन दिवस बत्तीगुल

कळंबोलीत दोन दिवस बत्तीगुल

Published on

नवीन पनवेल, ता.२६ (वार्ताहर)ः पनवेल, कळंबोली वसाहतीमध्ये दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. मंगळवारी सकाळी खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी सकाळी १० च्या सुमारास फक्त अर्ध्या तासासाठी आल्यामुळे तब्बल दोन दिवस कळंबोलीतील २५ हजार रहिवाशांना अंधारात राहण्याची वेळ आली होती.
कळंबोलीमध्ये दोन दिवसांपासून विजेचा खोळंबा सुरू आहे. महावितरणने दुरुस्तीसाठी मंगळवारी (ता.२५) दुपारपर्यंत शटडाऊन घेण्यात आला होता. मात्र, सायंकाळी काही ठिकाणी वीजपुरवठा सुरू झाला, तर काही ठिकाणी रात्रभर पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे हाल झाले होते. कळंबोली महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळपासून दुपारपर्यंत वीज वाहिनीवरील दुरुस्ती झाल्यानंतर दुपारी तीन वाजता तळोजा उपकेंद्रातून येणारी २२ केव्हीच्या वीज वाहिनीत बिघाड झाला. त्यानंतर रात्री फुडलॅण्ड कंपनीजवळ आरएमव्हीत बिघाड झाला आहे. हा बिघाड काही तासांमध्ये दुरुस्त केला जाईल, असे वीजग्राहकांना सांगण्यात आले. मात्र, या दुरुस्तीच्या कामाला पावणे सात वाजल्याने नागरिकांचे हाल झाले.
--------------------------------------------
पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होऊ नये, म्हणून महावितरणने मान्सूनपूर्व विजेची कामे केली होती. तसेच नोडमध्ये दर मंगळवारी दुरुस्तीसाठी पुरवठा खंडित गेला होता, पण तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा खंडित झाला होता.
- गोकुळ सोनवणे, विभाग अधिकारी, महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.