बालविवाह
बालविवाहSakal

Dombivali: ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानाला सुरूवात,मुरबाड तालुक्यातील किशोर गावात रॅली

डोंबिवली, ता २४ (बातमीदार) : कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन आणि सेवा संस्था ठाणे यांच्या सहयोगाने ‘बालविवाह मुक्त भारत’ या अभियानाला ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यात सुरुवात झाली. त्याच निमित्ताने मुरबाड तालुक्यातील किशोर गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्‌घाटन सरपंच जानू गायकर यांच्या हस्ते करण्यात आले.


कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन आणि सेवा संस्था ठाणे गेले वर्षभरापासून ठाणे जिल्ह्यातील आदिवासीबहुल भागात बालविवाह प्रतिबंधक करण्यासाठी जनजागृती करत आहे. कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन आणि सेवा संस्था यांच्यातर्फे बालविवाह मुक्त भारत हे अभियान १६ ऑक्टोबरपासून ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक गाव पातळीवर राबविले जाणार आहे.

या अभियानामध्ये बालविवाह सोबतच बालकांची सुरक्षेसाठी असलेले कायदे व नियम अंमलबजावणी करणे यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करण्यात येणार आहेत. या अभियानाद्वारे सर्वसामान्यांमध्ये जागृती करणे, बालविवाह मुक्तीसाठी शपथ घेणे, पोस्टर प्रदर्शित करणे, घोषणा देणे असे कार्यक्रम होणार आहेत. प्रसंगी सेवा संस्थेचे स्थानिक समुदाय संघटक पूजा ढमके, विद्या जोशी, रोहिणी चौधरी, दीपाली पवार सेवा संस्थेचे संस्थापक अशोक पवार, प्रकल्प समन्वयक रामेश्वर भाले, वैभव गायकवाड व संजीवनी जाधव उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com