अक्षरांचा गौरव ही महत्त्वाची गोष्ट ः म्हात्रे
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : अक्षरांमुळे साहित्य जगासमोर येते. त्यामुळे भाषेचा गौरव होत असताना ज्या रंगरूपातून भाषा आविष्कृत होते, अशा अक्षरांचाही गौरव होणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. अक्षरांना व्यक्तिमत्त्व देणाऱ्या सुलेखनकार अच्युत पालव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कलात्मक सादरीकरणाने आपण भारावून गेलो, अशा शब्दात कवी अरुण म्हात्रे यांनी भाषेसह अक्षरांचे महत्त्व विशद केले.
नवी मुंबई महापालिकेतर्फे ‘अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी’ यांच्या सहयोगाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत अक्षर सुलेखन प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या अक्षर सुलेखन प्रदर्शनास कवी अरुण म्हात्रे यांनी भेट दिली. प्रदर्शन पाहिल्यानंतर मराठी भाषेची व साहित्याची संपन्नता नव्याने जाणवली, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रदर्शनात कुसमाग्रज, सुरेश भट, ग. दि. माडगूळकर अशा दिग्गजांसमवेत माझीही कविता प्रदर्शित केली असल्याचा वेगळा आनंद असल्याचे म्हात्रे म्हणाले. कुणाला तरी तुमची कविता सुलेखनातून मांडावीशी वाटते यासारखा मोठा दुसरा आनंद नाही, असेही ते म्हणाले. अक्षरे साधी नसतात, त्यात भाव दडलेला असतो. भाषेचा नाद, वळण, लिपी, रंग आवडले तर भाषेची गोडी लागते. या सुलेखन प्रदर्शनातून आपल्याला हे सारे काही अनुभवाला मिळते, याचा विशेष उल्लेख त्यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

