वर्षा बंगला सत्तेचे केंद्रस्थान

वर्षा बंगला सत्तेचे केंद्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : महायुतीत जागा वाटपावरून अनेक उलथापालथी सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर बैठकांचे सत्र जोरदार सुरू आहे. यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी महायुतीचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. वर्षा बंगला हा सत्तेचा केंद्रस्थान आहे. या शासकीय बंगल्यावर खऱ्या अर्थाने पाहिले, तर तिकडे राजकारण सुरू झालेले आहे आणि ते योग्य नाही. तुम्हाला पक्षाच्या बैठका घ्यायच्या, तर पक्ष कार्यालयात घ्या. वर्षा बंगल्यावर हेमंत पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करणे किती योग्य आहे. याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील ठाकरे पक्षाच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दरेकर यांची गुरुवारी (ता. ४) भेट घेत अभिनंदन केले. या वेळी जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, काशिनाथ पाटील, प्रकाश तरे, मधुकर माळी, सुरय्या पटेल, संगीता मोरे, प्रकाश चव्हाण, विजय मोरे उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना महेश तपासे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केल्याचे सांगितले. तर विरोधी पक्षातील महायुतीत सुरू असलेल्या जागावाटपाच्या गोंधळावर त्यांनी ताशेरे ओढले.
एवढी मोठी नामुष्की मुख्यमंत्र्यांच्या पक्षावर येते. हिंगोलीचा उमेदवार जाहीर करतात. चोवीस तासांत त्याचे नाव वगळता. खासदार भावना गवळी यांचे तिकीट डावलतात. त्या एकट्याच नाही, तर त्यांचे तीन-चार उमेदवार आहेत. त्यात फेरबदल केलेले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला वर्षा बंगला हा सत्तेचा केंद्रस्थान आहे.


पुरोगामी पाऊल
एका भगिनीला उमेदवारी देणे हे एक फार मोठा पुरोगामी पाऊल उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने उचलले आहे. कोणी काही म्हटले तरी या जागेवर मोठा रणसंग्राम होणार आहे. दोन दिवसांपूर्वीच श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नये, असे वक्तव्य केले. यावरून त्यांनाही माहीत आहे की ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहेत, असे मत महेश तपासे यांनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याविषयी म्हणाले.

निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मतदारसंघ
या मतदारसंघात वीस एक लाख मतदार आहेत. मतदारांत तीन पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्या पक्षाचे कार्यकर्ते सोडून गेले. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हा मतदारसंघ आहे. दुसरीकडे भारतीय संविधानाला मानणारा दुसरा मतदार आहे. शेवटी राज्य सरकारची केस अजून थांबलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने त्या बंडाला क्लीनचिट दिली नाही. कालही अजित पवार यांच्या पक्षावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारच्या अस्मितेबद्दल, घटनात्मक पात्रतेबद्दल अजूनही निर्णय प्रलंबित आहे. तो लोकसभेनंतर लागू शकतो, असे वाटत असल्याचे तपासे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com