मुंबईत आजपासून अर्ज प्रक्रिया

मुंबईत आजपासून अर्ज प्रक्रिया

मुंबई, ता. २५ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य या चार मतदारसंघात शुक्रवारपासून (ता. २६) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी चारही लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.
मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यासाठीचा उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी (ता. २६) सुरुवात होणार आहे. ३ मे पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. ४ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून ६ मे रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे. त्यामुळे चारही मतदारसंघांत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सूचना फलक, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय येथील सूचना फलकावरही प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक यंत्रणेने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com