ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर महिलांच्या रांगा

ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर महिलांच्या रांगा

मोखाडा, ता. २९ (बातमीदार) : केंद्र आणि राज्य सरकारच्या जलजीवन योजनेच्या कामांचा ठाणे, पालघर जिल्ह्यांत बोजवारा उडाला आहे. त्याविरोधात श्रमजीवी संघटना महिनाभरापासून जनजागृती करत आंदोलन उभारले आहे. आता १० ते १०० रुपये प्रत्येक नागरिकाने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भरून आपला लोकसहभाग म्हणून या योजनेवर अधिकार सांगण्याचे अनोखे अभिनव आंदोलन महिलांनी केले आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

‘हर घर नल से जल’ ही जलजीवन योजना ग्रामीण भागात सदोष कामे झाल्याने बारगळली आहे. त्याविरोधात श्रमजीवी संघटना जनजागृती करत हंडा मोर्चा, ठिकठिकाणी वरचेवर टाकलेले पाईप उखडून टाकणे, तसेच एका हातात हंडा आणि दुसऱ्या हातात दांडा घेत आंदोलने केली आहेत. या आंदोलनांचा धसका घेऊन जिल्ह्यातील बरेचसे अभियंते आणि सर्वच ग्रामसेवक रजेवर गेले होते. मात्र, ते पुन्हा कामावर हजर झाले आहेत. आता जनता या योजनेची खरी मालक होण्यासाठी श्रमजीवी संघटनेने १० ते १०० रुपये ग्रामपंचायतीमध्ये भरून लोकसहभागासाठी अभिनव आंदोलन केले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला आहे.

पैसे भरून लोकसहभाग आल्याने जनतेचा अधिकार या योजनेवर आला आहे. आता जनतेला कोणीही रोखू शकणार नाही. जनता त्यांच्या दारात पाणी घेतल्याशिवाय राहणार नाही. संघटनेने महिनाभरापासून जनजागृती केली आहे. लोकसहभागामुळे जनता आता योजनेची खरी मालक झाली आहे. दुपारपर्यंत ३० हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे.
- विवेक पंडित, संस्थापक, श्रमजीवी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com