मतदारांच्या प्रतिक्रिया

मतदारांच्या प्रतिक्रिया

वसई तालुक्यात गुन्हेगारी अतिशय वाढलेली आहे. भावी खासदारांनी याकडे लक्ष केंद्रित करून गुन्हेगारी संख्या कमी करणे गरजेचे आहे. तसेच अनेक पाड्यांमध्ये मुलींवरील अत्याचार वाढत असून, महिला सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावी.
- नीलम पंडित

पावसाळ्यात सर्वाधिक त्रास जाणवतात. पाणी तुंबण्याची समस्या; तसेच आजारही या काळात मोठ्या प्रमाणात जाणवतात. यावर उमेदवाराने लक्ष केंद्रित करून त्या समस्या कमी करणे गरजेचे आहे. अनेकदा पावसाळ्यात कामे अडकून राहतात. प्रवास करणे आणि शहरात फिरणेही कठीण होते. शहर बंद पडते. अनेकांना तर आपला जीव गमवावा लागतो. अशा विविध समस्यांकडे लक्ष देणारे उमेदवार पाहिजे.
- आतिश दीक्षित

पेसा भरतीचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पालघरमध्ये त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहेत. पालघरच्या गावांमध्ये अनेक समस्या आहेत. फक्त शहरी समस्यांकडे लक्ष न देता गावातील मुद्द्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. गाव सुधारणार उमेदवार खासदार म्हणून बघायला आवडेल
- आशुतोष डावरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com