विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

उरण, ता. १ (बातमीदार) : उरण परिसरात महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे व दुर्लक्षितपणामुळे कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे घटना शनिवारी (ता. २७) दुपारी घडली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचे बेजबाबदार उपअभियंता राहुल शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. महावितरणच्या उरण कार्यालयात बोकरविडा येथील रवींद्र पाटील हे कंत्राटी पद्धतीने वायरमन म्हणून कार्यरत होते. ते शनिवारी मुळेखंड, तेळीपाडा परिसरात दुरुस्तीचे काम करण्यासाठी विद्युत खांबावर चढले होते. दरम्यान, त्यांना अचानक विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. विद्युत दुरुस्तीची कोणतीही कामे करीत असताना विद्युतपुरवठा खंडित करणे गरजेचे असते; मात्र उपअभियंता राहुल शिंदे यांनी हा विद्युत पुरवठा सुरू असताना रवींद्र पाटील यांना काम करण्यास कशी परवानगी दिली, असा सवाल उपस्थित नागरिकांतून विचारला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com