रोह्यात वणव्यामळे वनसंपदेचे नुकसान

रोह्यात वणव्यामळे वनसंपदेचे नुकसान

रोह्यात वणव्यामुळे वनसंपदेचे नुकसान
रोहा, ता. १ (बातमीदार) : नैसर्गिक सौंदर्याची देणगी लाभलेल्या रोहा तालुक्यात या वर्षीही वणव्याचे ग्रहण कायम आहे. मानवनिर्मित कृतीमुळे डोंगर, दऱ्याखोऱ्यांसह रानमेवा, आंबा, काजू बागा आगीच्या भक्ष्यस्‍थानी पडत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. ‌त्‍यामुळे ‘वणवामुक्त गाव‌’ ही संकल्पना केवळ कागदावरच शिल्लक राहिल्याने नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांत कळसगिरी डोंगर व शहराच्या चारही बाजूला असलेल्या डोंगराळ परिसरात वणवे लावण्याचे प्रकार घडले आहेत. या डोंगराळ परिसरात असलेल्या गवतावर वणवे लावून डोंगर उजाड केले जात आहेत. वणव्यामुळे परिसरातील अनेक झाडे तसेच आंबा, काजू, कोकम, करवंदाच्या जाळ्या, जांभूळ अशी फळझाडे जळून खाक होत आहेत. काही शेतकऱ्यांनी फळ बागायती वृक्ष लागवड केली आहे. वणव्यामुळे त्याचा फटका या बागायतींना बसत आहे. बागायतदार शेतकऱ्यांचे यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शासनाने वन विभागाच्या माध्यमातून ‌‘वणवामुक्त गाव‌’चे नियोजन केले आहे. त्यामुळे संबंधित गावातील सरपंच यांच्यावर वणवा न लागण्याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, शासनाचे दुर्लक्ष होत असल्‍याने वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. गुरांना पावसाळी हंगामात चांगला चारा मिळावा, याकरिता वणवे लावले जात असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच वणव्यामुळे कोकणची निसर्गसंपदा व फळ बागायतींची राख होत आहे. त्यामुळे वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. परिसरात सलग दोन दिवस वणवे पेटत आहेत. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्‍याने नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com