भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळवून देऊ : लोढा

भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळवून देऊ : लोढा

मुंबई, ता. १० : दक्षिण मुंबईच्या विकासासाठी येथील बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांना बाहेर काढून येथील नागरिकांना व मराठी व्यावसायिकांना, भूमिपुत्रांना त्यांचे हक्क मिळवून देऊ, असे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी परळ येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.

हा मेळावा महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या लोकसभा निवडणूक प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. निवडणूक झाल्यानंतरसुद्धा आपण आराम करणार नाही, नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू. निवडणुकांनंतर प्रत्येक वॉर्डात आम्ही येऊ, आपल्या समस्या ऐकून घेऊ, त्यासाठी जनता दरबार भरविला जाईल, कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डमधील भूमिपुत्रांसाठी रोजगारनिर्मिती होईल. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही त्यांना मिळेल. दक्षिण मुंबईमध्ये जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाची समस्या मोठी आहे. पुढील एका वर्षात पुनर्विकासाचा मार्ग सोईस्कर करण्यासाठी आपण युद्धपातळीवर कार्य करू. भारताचे जे विश्वगुरुपदाचे स्वप्न स्वामी विवेकानंदांनी पाहिले होते, ते पूर्ण करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊ या, असेही आवाहन लोढा यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com