मोदींचे राजकीय अस्तित्व बाळासाहेब ठाकरेंमुळे- विनायक राऊत

मोदींचे राजकीय अस्तित्व बाळासाहेब ठाकरेंमुळे- विनायक राऊत

मोदींचे राजकीय अस्तित्व बाळासाहेब ठाकरेंमुळे ः विनायक राऊत

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : नरेंद्र मोदी यांचे राजकीय अस्तित्व बाळासाहेब ठाकरे यांच्या कृपेमुळे कायम राहिले आणि त्या बाळासाहेबांच्या मुलाचा म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा उल्लेख मोदी नकली संतान म्हणून करतात. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी भाईंदरमध्ये पंतप्रधान मोदींचा समाचार घेतला. देशाचे दुर्दैव हे आहे, की असे पंतप्रधान आपल्याला मिळाले, अशी बोचरी टीकाही या वेळी राऊतांनी केली.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी भाईंदर पूर्व येथील नवघर मैदानावर जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी उपनेत्या व खासदार प्रियंका चतुर्वेदी, नितीन बानगुडे-पाटील, काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्पर हुसेन आदी उपस्थित होते. या वेळी नरेंद्र मोदी यांना देशभर प्रचार करताना संताजी-धनाजी यांच्याप्रमाणे केवळ राहुल गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे हेच दिसत असतात. इंडिया आघाडीच्या एकजुटीमुळे मोदी आणि अमित शहा हे वेडेपिसे झाल्याची टीकाही त्यांनी केली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे वादळ आणि राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे भाजपचे अस्तित्व संपवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com