दुरुस्ती कामामुळे पाणी गळती थांबली

दुरुस्ती कामामुळे पाणी गळती थांबली

रसायनी, ता. ११ (बातमीदार) : रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथे एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्राला अशुद्ध पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी एचओसी कॉलनीत फुटली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन वाया जात असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत होते. एमआयडीसीच्या पाताळगंगा नदीवरील उदंचन केंद्रातून अशुद्ध पाणी उचलून या मोठ्या जलवाहिनीतून वासांबे मोहोपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रात सोडण्यात येत आहे. या ठिकाणी पाणी शुद्ध करून गाव आणि कारखान्यांना पुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, जलवाहिनी फुटली असल्याची बाब जागृत नागरिकांनी एमआयडीसीच्या निदर्शनास आणून दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानंतर एमआयडीसीने नुकतेच दुरुस्तीचे काम करून पाणी गळती थांबवली असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे. वासांबे मोहोपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून रसायनीतील तसेच पनवेल तालुक्यातील इतर ग्रामपंचायत आणि रसायनीतील कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com