आनंद तेलतुंबडे यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

आनंद तेलतुंबडे यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

आनंद तेलतुंबडे यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळला

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सत्र न्यायालयाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण, तसेच एल्गार परिषदेत आनंद तेलतुंबडे यांचा प्रथमदर्शनी सहभाग दिसत असून खटला न चालवताच त्यांना दोषमुक्त करणे योग्य ठरणार नाही, असे निरीक्षण नोंदवत मुंबई सत्र न्यायालयाने आनंद तेलतुंबडे यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळून लावला.

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ मध्ये पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे हिंसाचार प्रकरण घडले. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. एप्रिल २०२० मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे यांना अटक केली. तेलतुंबडे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दोषमुक्ततेसाठी ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला, ॲड आर. सत्यनारायनन यांच्यामार्फत सत्र न्यायालयात अर्ज केला होता. विशेष एनआयए कोर्टाचे न्या. राजेश कटारिया यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. या अर्जावरील निकालाची सविस्तर प्रत शुक्रवारी (ता. १०) जाहीर करण्यात आली. यामध्ये तेलतुंबडे यांच्या वतीने वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, तेलतुंबडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात कोणत्याही पुराव्यांचा उल्लेख नाही. या प्रकरणात त्यांना गोवण्यात आले असून त्यांना दोषमुक्त करण्यात यावे. एनआयएने मात्र हा दावा फेटाळून लावत याचिकेला विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद ऐकून घेत अखेर तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार दिला व त्यांचा दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळून लावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com