पाणीटंचाईचे संकट गडद

पाणीटंचाईचे संकट गडद

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६- मान्सूनचे वेध लागले असतानाच दुसरीकडे वाढत्या उष्म्यामुळे धरणातील पाणीसाठा तळ गाठत असल्याचे समोर आले आहे. ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात अवघा २७.६६ पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तर मुंबई महापालिकेकडून ठाण्याला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात सुरू झाली आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तोंडावर ठाणेकरांवर पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे.

ठाणे हा धरणांचा जिल्हा आहे. यातील बहुतेक धरणांमधून मुंबई आणि ठाणे महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो, मात्र यावर्षी उष्णतेच्या पाऱ्याने ४० अंशाची मजल पार केली आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात ३० ते ४० टक्क्यांवर आलेला धरणांमधील पाण्याचा साठा आता २५ ते २७ टक्क्यांवर आला आहे. बारवी धरणामध्ये आजच्या घडीला २७ टक्के इतका पाणीसाठी शिल्लक आहे. ३३८.८४ दशलक्ष घनमीटर क्षमता असलेल्या या धरणाचा आजचा साठा ९३.७३ दशलक्ष घनमीटर इतका आहे.

मागील आठवड्याचा साठा ९८.७६ दशलक्ष घनमीटर इतका होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा, भातसा आदी धरणांनीही तळ गाठण्यास सुरुवात कोली आहे. परिणामी मुंबई महापालिकेने १५ दिवसांपूर्वी मुंबईच्या पाणीपुरवठ्यात पाच टक्के पाणीकपात केली. मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला १०० एमएलडी पाणी मिळते. ठाण्यातील वागळेसह अनेक भागामध्ये या पाण्याचे वितरण होते, पण आता मुंबई पालिकेने १० टक्के पाणीकपात केल्याने त्याची झळ ठाणे शहरालाही बसण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिकेनेही ५ जूनपासून पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com