साडे आठ लाख शेतकऱ्यांना मिळणार सौर कृषी पंप

साडे आठ लाख शेतकऱ्यांना मिळणार सौर कृषी पंप

साडेआठ लाख शेतकऱ्यांना मिळणार सौर कृषी पंप
महावितरणचे उद्दिष्ट; एकही वीजजोडणी प्रलंबित राहणार नाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : राज्याच्या सौर कृषी पंप योजनेंतर्गत डोंगराळ भागातील शेतकऱ्यांना पारेषणविरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्याचा निर्णय महानिर्मितीने घेतला आहे. त्यानुसार पुढील काळात तब्बल साडेआठ लाख शेतकऱ्यांना हे पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना ना वीज बिलाचे टेन्शन, ना वीजपुरवठा खंडित होल्याचे टेन्शन.
सध्या महावितरणकडून ६० लाखांहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना आपल्या वीज वितरण जाळ्याच्या माध्यमातून वीजपुरवठा केला जात आहे. सदरची वीज स्वस्त दिली जात असली, तरी त्याच्या क्राॅस सबसिडीचा भार औद्योगिक, वाणिज्यिक ग्राहकांवर पडतो. तो कमी करण्यासाठी राज्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांना पारेषणविरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे क्राॅस सबसिडीचा भार कमी होणार असून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. तसेच प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली या योजनेंतर्गत ग्राहकांना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com