ठाणे जिल्ह्यातील १३ तलावांचा कायापालट

ठाणे जिल्ह्यातील १३ तलावांचा कायापालट

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : पर्यावरण संतुलन व जैवविविधतेत तलाव, सरोवर व जलाशयांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचे जतन करण्यासाठी केंद्र सरकाने सरोवर संवर्धन योजना आणली. या योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील १३ तलावांच्या कामांना सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तलावांचा कायापालट होणार असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही अनेक तलाव हे जुने व इतिहासकालीन आहेत. या तलावांचे संवर्धन व जतन करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरोवर संवर्धन योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडून पाच तालुक्यांतील १६ तलावांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी १३ तलावांच्या कामांना केंद्र सरकारकडून हिरवा कंदील दाखविण्यात आला असून त्या तलावांच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत तलावांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तलावातील गाळ काढणे, तलावाभोवती उद्यान, वृक्ष लागवड करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, वॉकिंगसाठी ट्रॅक बनविणे, संरक्षक भिंत उभारणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

भिवंडी आघाडीवर
पाच तालुक्यांतून पाठविण्यात आलेल्या १६ पैकी १३ प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये भिवंडीतील सर्वाधिक १०, तर अंबरनाथ तालुक्यातील तीन तलावांना मंजुरी मिळाली आहे. या तलावांच्या कामाची तांत्रिक मान्यता घेऊन निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com