पाली पुलावरील रस्त्याची चाळण

पाली पुलावरील रस्त्याची चाळण

Published on

वाडा, ता. १ (बातमीदार) : वाडा-मनोर महामार्गावरील पाली पुलावरील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे प्रवासी, ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. या पुलावर मोठ्या आकाराचे असंख्य खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने खड्डे दिसत नाहीत. परिणामी, वाहन चालवताना चालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय, या खड्ड्यांत वाहने जोरात आदळत असल्याने अपघाताचा धोकासुद्धा आहे.

वाडा-मनोर महामार्गावरील पिंजाल पुलासह रस्त्यावर अनेकदा दुरुस्ती केली आहे; मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे व सततच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना होडीत बसल्याचा अनुभव येत आहे. वयोवृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांना प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकर हा मार्ग सुस्थितीत करावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

वाडा-मनोर रस्त्याचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे. पिंजाळ नदीवरील पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध तसेच रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. ऐन पावसाळ्यात पुलावरील खड्ड्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होते. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून हा विषय मार्गी लावावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

पाली पुलावर अक्षरशः गुडघ्यावर खड्डे पडले आहेत. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खड्डे दिसत नाहीत. वाहन चालवताना अपघाताची भीती वाटते. बांधकाम प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.
-संतोष थोरात, ग्रामस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.