अपुऱ्या पाणीपुरवठाची विधानसभा अध्यक्षांकडून दखल

अपुऱ्या पाणीपुरवठाची विधानसभा अध्यक्षांकडून दखल

Published on

अपुऱ्या पाणीपुरवठ्याची विधानसभा अध्यक्षांकडून दखल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी (ता. ५) तातडीची बैठक बोलावली आहे.

विधानसभेत बुधवारी (ता. ३) आमदार ॲड. आशीष शेलार यांनी वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खारदांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी मांडल्या. मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांनी मुंबईकरांना २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात दोन तासही पाणी मिळत नाही. वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रात २४ तास पाणीपुरवठ्याचा पायलट प्रकल्प राबविण्यात आला. तो पूर्ण अपयशी ठरला, त्यामुळे आता एक तासभरही पाणी मिळत नसल्यामुळे रहिवाशांमध्ये असंतोष आहे. मुंबईच्या सगळ्याच भागात याबाबत तक्रारी असल्याचे शेलार यांनी लक्ष वेधले. त्याला मुंबईतील अन्य आमदारांनी पाठिंबा दिला. याची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका जल अभियंत्यांनी तातडीने मुंबईतील पाणीपुरवठ्याची माहिती संबंधित मंत्र्यांमार्फत सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, शुक्रवारी आमदार, पालिका अधिकारी आणि संबंधित मंत्री यांची बैठक विधानभवनात आपल्या दालनात घेण्यात येईल, अशी घोषणा राहुल नार्वेकर यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.