विमानप्रवाशांना लेट मार्क

विमानप्रवाशांना लेट मार्क

Published on

विमान प्रवाशांना लेट मार्क
उड्डाणाची संख्या कमी करूनही प्रवाशांना मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता ३ : भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुंबई विमानतळावर पीक अवर्समध्ये विमानांची वाहतूक कमी करूनही विमान वाहतुकीची लेट मार्कमधून सुटका झालेली नाही. याचा ‘विस्तारा’च्या विमान प्रवाशांना बुधवारी (ता. ३) एक तास विलंबाचा फटका बसला. मुंबईहून दिल्लीला जाणारे विमान मुंबई विमानतळावर उशिरा उतरल्याने त्याच्या परतीच्या प्रवासाला एक तास उशीर झाला.
विमानाचा वक्तशीरपणा सुधारावा, यासाठी एकीकडे गर्दीच्या वेळी विमानांच्या उड्डाणाची संख्या कमी केली आहे; तरीही विलंब होत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. कोरोनाकाळात लागू केलेले निर्बंध हटवल्यानंतर विमानतळांवरील हवाई वाहतूक वाढली आहे. देशातील सर्वात व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळाला याचा फटका बसत असून विमानांना धावपट्टीवर उतरायला विलंब होत आहे. त्यामुळे इंधनही वाया जात असून उड्डाणांची स्थिती, गर्दी कमी करण्यासाठी आणि वक्तशीरपणा सुधारण्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुंबई विमानतळाला नियोजित विमान उड्डाणांची संख्या कमी करण्यासाठी पीक अवर्समध्ये खासगी उड्डाणांची संख्या मर्यादित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, मुंबई विमानतळावर असलेल्या गर्दीमुळे विमान उतरण्यास विलंब झाला. यापुढे वेळ पाळण्याची काळजी घेऊ, असे विस्तारा कंपनीच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

..
बुधवारी सकाळी ११.५० वाजता मुंबई ते दिल्ली विमान उड्डाण अपेक्षित होते. ऐनवेळी बोर्डिंग गेट बदलण्यात आले, तसेच उशिराने उड्डाण करणार असल्याचे सांगण्यात आले. विमान दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक तास उशिरा निघाल्याने गैरसोय झाली.
- प्रथम टंडन, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.