चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

Published on

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या
भिवंडी, ता. ५ (बातमीदार) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची ओढणीने गळा आवळून हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना समोर आली आहे. शहरातील भादवड गावात ही घटना घडली. याप्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.

लक्ष्मीदेवी कांचन दास (वय २८) असे मृत पत्नीचे नाव आहे, तर कांचन नथनी दास असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीदेवी ही मूळची बिहारमधील नरहन स्टेट पक्कीवाद गावात राहत असून ती लग्नानंतर पतीसोबत भिवंडीतील नरेश म्हात्रे यांच्या चाळीत भाड्याच्या खोलीत राहत होती. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. दरम्यान, कांचन याला लक्ष्मीच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला होता. या संशायातून त्याने २७ जून ते ३ जुलै रोजीच्या दरम्यान राहत्या घरात तिची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर हत्येचे पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह भादवड गावातील शेतातील वापरात नसलेल्या विहिरीत फेकून दिला. त्यानंतर लक्ष्मीच्या बहीण, आई व भावाची दिशाभूल करण्यासाठी लक्ष्मी ही दुसऱ्या तरुणासोबत पळून गेल्याचे त्याने सांगत शांतीनगर पोलिस ठाण्यात पत्नी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करीत कांचनचा डाव उधळून लावत त्यास बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला शुक्रवारी (ता. ५) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.