धारावीत साचले पाणी

धारावीत साचले पाणी

Published on

धारावीत साचले पाणी
धारावी, ता. ८ (बातमीदार) : मुंबईत पडलेल्‍या पावसामुळे धारावीमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होेते. उपनगरीय रेल्वे सेवादेखील विस्कळित झाली होती.
धारावीतील धोबीघाट, ट्रांझिस्ट कॅम्प, लक्ष्मीबाग, शास्त्रीनगर, राजीव गांधीनगर, काळा किल्ला, खांबदेवनगर, शेटवाडी, मुकुंदनगर आदी भागात पाणी साचले होते. साचलेल्या पाण्यातूनच स्थानिकांना दैनंदिन व्यवहार उरकावे लागत होते. थोडासा पाऊस झाला तरी धारावीतील काही भागात लगेच पाणी साचते. हजारो कुटुंबाना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो.
घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली. पावसाने थोडी उसंत घेतल्यावर स्थानिकांना घरात शिरलेले दुर्गंधीयुक्त पाणी हाताने उपसून काढावे लागले. त्यामुळे धारावीत संताप व्यक्त होत आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. अनेक विभागातील अंतर्गत नालेसफाई झाली नसल्‍याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्‍यामुळे पाणी साचत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.