दहा हजार विद्यार्थ्यांना 
शैक्षणिक साहित्याचे वाटप

दहा हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Published on

पालघर (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील औंदे येथील श्री स्वामी समर्थ परिवाराच्या श्री स्वामी समर्थ मठातर्फे विक्रमगड आणि जव्हार तालुक्यातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या १० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, स्कूल बॅग व अन्य साहित्याचे वाटप करण्यात आले. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य वाटपाचा अभिनव कार्यक्रम रविवारी (ता. ७) पार पडला. श्री स्वामी समर्थ परिवाराच्या लक्ष्मीकांत दांडेकर आणि अर्चना दांडेकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाला खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संतोष पावडे, विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रवींद्र पारखे, सागर आळशी आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षणापासून एकही मुलगा वंचित राहू नये, विशेष करून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, हा उद्देश ठेवून लक्ष्मीकांत दांडेकर यांनी २१ वर्षांपासून विक्रमगड तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य विद्यार्थ्यांना नित्यनेमाने देत आहेत. याच बरोबरीने या संस्थेमार्फत नागरिकांसाठी व्यसनमुक्ती, तरुण मुलींसाठी वैद्यकीय शिबिर, सॅनिटरी पॅडचे वितरण व इतर उपक्रम राबविले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.