मुंबईकरांना सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध

मुंबईकरांना सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध

Published on

मुंबईकरांना सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका जलसाठा उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई शहराला पाणी पुरविण्याऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रांत अजूनही पावसाचा जोर वाढलेला नाही. मात्र आतापर्यंत झालेल्या हलक्या पावसाने तलावांच्या पाणी पातळीत वाढ होत असून जलसाठा २१ टक्क्यांवर आला आहे. येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल इतका जलसाठा सर्व धरणांमध्ये उपलब्ध झाल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.

मुंबईत जूनपासून पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मुंबईत आजही १० टक्के पाणीकपात सुरूच आहे. ठाणे, पालघर, नाशिक जिल्हा परिसरातील पाच प्रमुख तलावांच्या पाणलोट क्षेत्रांत अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नाही. तलाव क्षेत्रांत जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर आणि भिवंडी, निजामपूर महापालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांतील पाणीसाठ्याच्या पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबईकर व महापालिका प्रशासनाला पाणी समस्येबाबत चिंता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांत हलक्या पावसाने तलावांमध्ये २१ टक्के म्हणजे ३ लाख १३ हजार ६२८ इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे. हा जलसाठा सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल अशी माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.