दोन गुन्हेगार तडीपार

दोन गुन्हेगार तडीपार

Published on

भाईंदर (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी चार जिल्ह्यांतून तडीपार केले आहे. लारा पालनाथ नाडार आणि गणेश मोहन शेट्टी अशी त्यांची नावे आहेत. दोन्ही गुन्हेगारांना मिरा-भाईंदर परिमंडळ एकच्या पोलिसांनी गंभीर दुखापत करणे, गर्दी करून मारामारी करणे, दुखापत करून जबरी चोरी करणे यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात याआधीही अटक केली होती; मात्र त्यानंतरही त्यांच्या गुन्हेगारी स्वभावात बदल झाला नाही. २०२४ या वर्षात त्यांच्यावर खंडणी मागणे, महिला अत्याचार, अपंग व्यक्तीशी गैरवर्तन आदी दहा गंभीर गुन्हे दाखल झाले. त्यामुळे मिरा-भाईंदर वसई-विरार अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत पाठक, तसेच परिमंडळ एकचे उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दोन्ही गुन्हेगारांना ठाणे, पालघर, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.