चिराग रूरल डेव्हलोपमेंट फाउंडेशन, मुंबई कडून खोस्ते गावांमध्ये शाश्वत विकासासाठी प्रयत्न
चिराग फाउंडेशनमार्फत खोस्ते गावांमध्ये शाश्वत विकास
विक्रमगड, ता. १९ (बातमीदार) : चिराग ग्रामीण विकास फाउंडेशन अखंड भारतातील अविकसित गावांच्या उन्नतीसाठी काम करते. या संस्थेमार्फत तालुक्यातील मागास व दुर्गम भाग असलेल्या खोस्ते भागात शाश्वत विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी खोस्ते भागातील जनतेला लाभ होईल, अशा योजनांना सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांत या स्वयंसेवी संस्थेने ग्रामीण शाळांमध्ये स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सौरऊर्जेवर चालणारे पाणी फिल्टरेशन यंत्र बसवले आहे. विक्रमगड खोस्ते भोयेपाडा, वाणीपाडा जिल्हा परिषद शाळेत व अंगणवाडी यांना दूरदर्शन संच दिले आहेत. शेतकऱ्यांना बी-बियाणे वाटप करण्यात आले. सद्य:स्थितीत गावात सुलभ वाचनालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यानिमित्त चिराग फाउंडेशनचा चमू व गावचे सरपंच, ग्रामस्थ व जिल्हा परिषदेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
सौरऊर्जेच्या वापरावर केंद्रित एकात्मिक ग्रामीण विकासातील प्रभावी कार्यासाठी मुंबईस्थित चिराग ग्रामीण विकास फाउंडेशनला २०२३ साठी ग्रामीण विकासासाठी सर्वोत्तम स्वयंसेवी संस्था म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.