भरपाईच्या कार्यवाहीला पालकमंत्र्यांचे निर्देश

भरपाईच्या कार्यवाहीला पालकमंत्र्यांचे निर्देश

Published on

पालघर, ता. ८ (बातमीदार) : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे, तसेच सार्वजनिक सुरक्षेची खात्री करण्याचे आणि जेथे आवश्यक असेल तेथे त्वरित मदत पुरवण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसासह आलेल्या वादळी वाऱ्यामुळे ७६७ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच सुमारे ५० मासेमारी नौकादेखील नुकसानग्रस्त झाल्या आहेत. वादळ आणि पावसामुळे पालघरच्या अनेक तालुक्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. डहाणू तालुक्यात सर्वाधिक २३० घरांचे नुकसान झाले. विक्रमगड आणि वाडा येथे प्रत्येकी ९२, जव्हारमध्ये ८९, मोखाडा येथे ८७, पालघरमध्ये ८५, तलासरीत ६३ आणि वसईमध्ये २९ घरांचे नुकसान झाले आहे. धाकटी डहाणू गावात सुमारे ५० मासेमारी नौका आणि १० ते १२ घरे नुकसानग्रस्त झाली आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी परिस्थितीची माहिती घेऊन तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि मदत पोहोचवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम प्रभावित भागात पाठविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com