सिद्धेश्वर तलावात जीवघेणे प्रदूषण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिद्धेवश्वर तलावात पुन्हा हजारो मृत माशांचा खच पडला आहे. १५ दिवसांतील ही दुसरी घटना असून, जलपर्णींसह प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सिद्धेश्वर तलावात २४ एप्रिल रोजी मृत माशांचा खच आढळून आला होता. ही बाब समोर येताच पालिकेच्या पथकाने तलाव स्वच्छतेची जबाबदारी ठेकेदारासह घटनास्थळी दाखल झाले होते. या तलावाच्या अवतीभवती नागरी वस्तीतील सांडपाण्यामुळे वाढलेल्या जलपर्णीने प्राणवायूची पातळी घसरून मासे मृत पावत असल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाने केला होता. याची दखल घेत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी वस्तीमधून येणाऱ्या सांडपाण्याला पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार परिसराचे सर्वेक्षणातून गळती असलेली ठिकाणे शोधून काढण्यात आली आहेत, मात्र नव्याने ड्रेनेजचे जाळे उभारण्यासाठी थोडा वेळ लागणार असल्याचे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले, पण १५ दिवसांनी पुन्हा मृत मासे आढळल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
-----------------------------------
पालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न
तलावातील जलपर्णी हटवण्यात आली आहे. गवताची जलपर्णी काढल्यानंतर तिथे फॉस्फरेट, नायट्रेट प्रदूषण वाढतच आहे. ही जलपर्णी प्रदूषणाचे घटक खात होती, पण तलाव पूर्ण आच्छादून गेल्यामुळे प्राणवायू कमी झाला आहे. त्यामुळे तलावातील हिरवी पानगळ काढण्याचे काम सुरू आहे. तसेच तलावाचे प्रदूषण कमी करण्यासाठी सोमवारी आणखी चार मशीन लावण्यात येणार असल्याचे मनीषा प्रधान यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.