धरणांच्या तालुक्यात पाणीटंचाईचे संकट

धरणांच्या तालुक्यात पाणीटंचाईचे संकट

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा असलेला तालुका सध्या भीषण पाणीटंचाईला सामोरा जात आहे. ३९ गावे आणि १३७ पाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून ४८ टँकरमधून पाणी पुरवले जात आहे; पण लोकसंख्येच्या तुलनेत पुरवठा अपुरा असल्याने ‘धरण उशाला... कोरड घशाला...’ अशी अवस्था शहापूर, मुरबाड तालुक्याची झाली आहे.
ठाणे जिल्ह्यात वस्ती असलेल्या गावांची संख्या ८०७ आहे. तर एक हजार ९७५ पाडे आहेत. यातील २८४ गावे आणि ५१४ गावांना दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यामध्ये शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावपाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विंधन विहीर, हातपंप यासह जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्यक्ष ‘हर घर नल से जल’ योजनेतून घराघरांत पाणीपुरवठा करण्याचा दावा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे; मात्र ही योजना अपूर्ण असल्याने गाव-पाडे टँकरवर अवलंबून आहेत.
-------------------------------------------
भीषण परिस्थितीचा अंदाज
शहापूर तालुक्यात पाणीटंचाईची भीषण परिस्थिती आहे. सध्या १४२ ग्रामपंचायतींमधील ३४ गावे आणि १२६ पाड्यांवर ४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर मुरबाड तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींमधील पाच गावे आणि १८ पाड्यांवर चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com