ऐरोलीतील रिलांबल प्लाझाजवळ रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा
वाशी, ता. १३ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली येथून एमआयडीसीच्या रस्त्यावर जाण्यासाठी मार्गिका आहे. या मार्गिकेच्या ठिकाणी रिलांबल प्लाझा या आयटी कंपनीच्या रस्त्यावर बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर कशाही पद्धतीने रिक्षाचालक रिक्षा पार्क करीत असल्यामुळे पादचारी व वाहनचालकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर ऐरोली रिलांबल प्लाझा या आयटी कंपनीसमोर बेशिस्त रिक्षाचालक हे कशाही पद्धतीने वाहने पार्क करतात. सकाळ-संध्याकाळच्या वेळेस आयटी कंपनीमधील कर्मचारी हे कामावरून सुटल्यानंतर रिक्षा पकडण्यासाठी घाई करीत असतात. रिक्षाचालकदेखील प्रवाशांची वाट बघत रस्त्यातच कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षा पार्क करीत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. कंपनीचे खासगी सुरक्षा रक्षकदेखील कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या गाड्या प्रथम सोडण्यास प्राधान्य देत वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. ठाणे-बेलापूर मार्गावर दिघा येथील परिसरात वाहतूक कोंडी झाल्यास रिलांबल प्लाझा येथून एमआयडीसी रस्त्यामार्गे जाण्यासाठी रिक्षाचालक या रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करतात; पण या रस्त्यावर रिक्षाचालकांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याचा वापर करण्यास वाहनचालकदेखील धजावत नाहीत. यासंदर्भात वाहतूक पोलिस निरीक्षक संजय बेंडे यांच्याशी संपर्क साधला असता वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत असते. रिलांबल प्लाझाजवळ रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची पाहणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.