‘ते’२६ जीव पुन्हा येणार का?

‘ते’२६ जीव पुन्हा येणार का?

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ ः भारताने काय करायचे, हे सांगणारे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत. त्यांच्या सांगण्यावरून २६ जीव पुन्हा येणार आहेत का, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी करत केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. त्याला उत्तर म्हणून पाकिस्तानविरोधात रणशिंग फुंकत भारतीय लष्कर आपली कामगिरी बजावत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. यावरून राजकारण तापले असून, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जनतेला संबोधून भूमिका स्पष्ट केली, पण निव्वळ सारवासारव असून, या कृत्याची सल प्रत्येक भारतीयांच्या मनात असल्याची खंत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात बोलून दाखवली.
----------------------------------------------
ट्रम्प यांनी जाहीरपणे भारताला धमकावले, असे सांगितले. हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. आम्ही घाबरण्यातील जमातच नाही. आमचे परराष्ट्रीय धोरण ते ठरवणार असतील, तर भारताने गुलामगिरी पत्करण्यास सुरुवात केली आहे, हेच यातून दिसते, असे म्हणावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com