९६.५९ टक्क्यांसह मुलींची बाजी
पालघर, ता. १३ (बातमीदार) : मार्चमध्ये झालेल्या दहावी शालांत परीक्षेचा पालघर जिल्ह्याचा सरासरी निकाल ९५.३८ टक्के लागला आहे. उत्तीर्ण होण्यामध्ये मुलींनी बाजी मारली असून मुलींचा सरासरी निकाल ९६.५९ टक्के, तर मुलांचा सरासरी निकाल ९४.२८ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त निकाल वसई तालुक्याचा ९६.४८ टक्के, तर सर्वात कमी निकाल जव्हार तालुक्याचा ९०.२४ टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
पालघर जिल्ह्यातून दहावी परीक्षेसाठी ३३ हजार ३५५ मुले आणि ३० हजार २६२ मुली अशी एकूण ६३ हजार ६१७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३१ हजार ४४८ मुले, तर २९ हजार ३३२ मुली असे एकूण ६० हजार ६८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ९४.२८ टक्के मुले, तर ९६.५९ टक्के मुली असा एकूण ९५.३८ टक्के निकाल लागला आहे. बारावीच्या परीक्षेप्रमाणे दहावीमध्येही मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे.
पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय निकाल
तालुका टक्के
वाडा ९२.४०
मोखाडा ९३.३७
विक्रमगड ९४.२६
जव्हार ९०.२४
तलासरी ९४.४४
डहाणू ९३.३६
पालघर ९५.१५
वसई ९६.४८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.