‘आंबेडकरांनी देशाला बुद्ध परत मिळवू दिले’

‘आंबेडकरांनी देशाला बुद्ध परत मिळवू दिले’

Published on

‘आंबेडकरांनी देशाला बुद्ध परत मिळवून दिले’
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रात बुद्ध जयंती साजरी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः तथागत गौतम बुद्ध ही खऱ्या अर्थाने भारताची ओळख आहे, मात्र मध्यंतरी अनेकांनी भारतातून बौद्ध धर्म संपविण्याचा प्रयत्न केला, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी बौद्ध धर्माची निवड करून भारताला बुद्ध तत्त्वज्ञान परत मिळवून दिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, उचल्याकार लक्ष्मण गायकवाड यांनी केले. अंधेरी येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्रात बुद्ध जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
देशातील त्या वेळच्या व्यवस्थेने बुद्ध तत्त्वज्ञान संपवण्याचे प्रयत्नच केले नाहीत, तर पालीसारखी भाषादेखील त्यांच्या नजरेला खुपत होती. त्यांनी पाली भाषेतूनच संस्कृतला जन्म दिला आणि लोकांना ही देवाची भाषा असल्याचे सांगितले. त्यामुळे समाज भरकटल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाला ‘सकाळ’चे मुख्य संपादक राहुल गडपाले, ज्येष्ठ पत्रकार विनायक परब, ज्येष्ठ साहित्यिक उचल्याकार लक्ष्मण गायकवाड, दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानवांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत बच्छाव यांनी उपस्थितांना संस्थेच्या कार्याबद्दल अवगत करून दिले.
ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांनी आपल्या भाषणात बौद्ध तत्त्वज्ञानाचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व प्रभावीपणे मांडले. त्यांनी आपल्या भाषणात अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ दिले. तेर येथील त्रिविक्रम मंदीर हे भारतातीतल एक प्राचीन मंदिर असून, त्याचा उगम बौद्ध विहारातून झाला असल्याचे ऐतिसासिक पुरावे त्यांनी साधार स्पष्ट करून सांगितले. बुद्धाचे तत्त्वज्ञान आणि आजच्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या अतिवापरावरदेखील त्यांनी प्रकाश टाकला. संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशिलाचे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी भारत पाकिस्तानाच्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मानवंदना वाहण्यात आली.
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष नितीन सोनावणे, कोषाध्यक्ष सदाशिव गांगूर्डे, विश्वस्त सुनील वाघ, संजय जाधव, नीना हरिनामे, चेन्नई येथील जीएसटीचे मुख्य आयुक्त राजेश ढाबरे, उद्योजक विवेक वाघ, शिवसेना उबाठाचे विभागप्रमुख राजेश शेट्ये, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघे, सुप्रसिद्ध गायिका भावना. ढाबरे, डॉ. क्रांती. गवळी आणि अनिल पगारे यांचीही उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com