उन्हाळी भातशेतीचे नुकसान

उन्हाळी भातशेतीचे नुकसान

Published on

पाली, ता. १५ (वार्ताहर) ः मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव, मुठवली बुद्रुक व खांब गाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भातशेती केली जाते. हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्‍य मशागत यामुळे उन्हाळी भातशेतीतून शेतकऱ्यांना हुकमी पीक व उत्पन्न मिळत; मात्र पावसामुळे कापणीला आलेले पीक पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या धान भिजले असून अशातच कापणी व झोडणीची कामे सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी लागवड केलेल्‍या भाताच्या आता लोंब्या डोलू लागल्या होत्या. त्यामुळे हाती भरघोस पीक लागणार असल्‍याने शेतकरीही सुखावले होते. अनेकांनी १० मेनंतर भात कापणीचे नियोजन केले होते; मात्र ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्‍याने पिकाचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचले असून भिजलेला भाताचा दर्जा घसरण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. पेंढा भिजल्याने त्‍यालाही भाव मिळणार नसल्‍याने शेतकरी चिंतेत आहेत.


हाती आलेले भातपीक पूर्णपणे भिजले असून दर्जा खालावला आहे. त्याला भावही मिळणार नाही. तब्बल २५ ते ३० हजारांचे नुकसान झाले आहे. सरकारने याची दखल घेत, ताबडतोब पंचनामा करावा व नुकसानभरपाई द्यावी.
- चंद्रकांत येळकर, शेतकरी, रोहा-पुगाव

हुकमी पीक वाया
हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भातशेतीमधून शेतकऱ्यांना हुकमी पीक मिळते. पावसाळ्यातील शेतीतून मिळणाऱ्या उत्पादन व उत्पन्नापेक्षा उन्हाळी शेतीतून अधिक चांगले उत्पादन व उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकरी समाधानी असतात. काही शेतकरी तर पावसाळ्याऐवजी उन्हाळी शेती करण्याला प्राधान्य देतात; मात्र यंदा पावसाने उन्हाळी भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com