विकसकासकामुळे कसारामध्ये कृत्रिम पाणी टंचाई
विकसकामुळे कसारामध्ये कृत्रिम पाणीटंचाई
चंद्रकांत जाधव यांची कारवाईची मागणी
शहापूर, ता. १४ (वार्ताहर) : तलावापासून ५०० मीटर अंतरापर्यंत बोअरवेल अथवा विहीर खोदण्यास मनाई असताना विहीर खोदल्यामुळे तसेच कालव्याचे पाणीदेखील खासगी बांधकाम विकसकास उचलू दिल्यामुळे ५० हजार लोकसंख्येच्या कसारा गावात कृत्रिम पाणीटंचाई सुरू झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे तालुका संघटक चंद्रकांत जाधव यांनी केला आहे. खासगी विकसकास नाल्याचे पाणी उचलू देऊ नये तसेच तलाव परिसरात मनाई असताना विहिरी खोदण्यास ग्रामपंचायतीने परवानगी कशी दिली? या संपूर्ण प्रकारणाच्या चौकशीची मागणी जाधव यांनी केली असून, याबाबत त्यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन दिले आहे.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात जाधव यांनी म्हटले आहे, की धोबीपाडा, मोखावणे आणि कामडीपाडा येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कामडीपाडा व धोबीपाडा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरी आटल्या आहेत. तालुक्यात सर्वत्र पाणीटंचाई सुरू असताना कसाऱ्यातीलही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत जाधव यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.