ऐरोली रस्त्याचे डांबरीकरण कधी?

ऐरोली रस्त्याचे डांबरीकरण कधी?

Published on

तुर्भे, ता. २० (बातमीदार) : नवी मुंबई पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने जी विभाग कार्यालयांतर्गत विविध विकासकामे केली आहेत. यात मागील कित्येक वर्षे प्रलंबित ऐरोली सेक्टर चार, पाच या ठिकाणी असलेल्या मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याचे काम जानेवारीत सुरू केले होते. मलनिस्सारण वाहिन्यांचे काम पूर्ण झाले; मात्र त्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. आता मे महिना संपत आला तरी येथील खोदलेल्या रस्त्यावर अजूनही डांबरीकरण केले नसल्याने येथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
ऐरोली सेक्टर चारमधील सुशीलादेवी देशमुख विद्यालय ते संतोषी माता मंदिर, सेक्टर पाचमधील अष्टदर्शन सोसायटी, जय जवान पोलिस मित्र सोसायटी येथील मलनिस्सारण वाहिन्या बदलण्याचे काम चार महिन्यांपूर्वी सुरू केले होते; मात्र खोदलेल्या खड्ड्यांमध्ये फक्त खडी टाकून ठेवल्याने येथील वृद्ध, लहान मुलांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे श्वसनाचे विकार, सर्दी-खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने या परिसरात चिखल झाला होता. स्थानिक राजकीय नेत्यांमुळे या कामात खो घालण्यात येत असल्याचे बोलले जात असून, डांबरीकरण झाले नसल्याने याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. मलनिस्सारण वाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. रस्ते डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ऐरोली जी विभाग कार्यालयाचे उपअभियंता गजानन पुरी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com