पालघर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन

पालघर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन

Published on

पालघर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन
पालघर, ता. २० (बातमीदार) ः पालघर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. पालघर येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर सोमवारी १९ मे रोजी आंदोलन पुकारून आपल्या विविध मागण्या सादर केल्या.
कृषी सेवकपद रद्द करून त्यांना नियमित कृषी सहाय्यकपदावर नियुक्ती देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या वेळी करण्यात आली. तसेच पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम निर्माण करावे. कृषी विभाग पूर्णपणे डिजिटल प्रणालीवर सुरू आहे, असे असताना कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिला जात नसल्याने अनेकांची गैरसोय होते. त्यामुळे त्यांना काम करणे अवघड जाते. या कामासाठी लॅपटॉप दिले जावेत. गावपातळीवर काम करताना तलाठी व ग्रामसेवक यांना मदतनीस दिला जातो, मात्र कृषी सहाय्यकांना अनेक कामे असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडतो. अशावेळी सहाय्यकांनाही कृषी मदतनीस द्यावा, अशी संघटनेची मागणी आहे. कृषी पर्यवेक्षक हे पद वाढवून कृषी सहाय्यकाच्या पदोन्नतीमधील त्रुटी दूर करून आकृतीबंध तयार करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली. अशा विविध मागण्यांचे निवेदन कृषी अधीक्षकांकडे देण्यात आले आहे, मात्र त्‍याकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने अखेर संघटनेकडून आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले.
अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्‍यातच पालघर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने नुकसानभरपाईचा पंचनामा करण्याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com